सुदृढ व सशक्त लोकशाही साठी
सध्या कॉंग्रेस पक्षाची चालू असलेली वाताहत पाहत असताना अनेक जण असा सूर आळवू लागले आहेत की लोकशाही साठी सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष हवा आणि एक जुना व देशव्यापी पक्ष म्हणून ती जबाबदारी कॉंग्रेस ची आहे.. पण आपला पक्ष वाढवणे व त्याला पूर्वीचे दिवस आणून देणे , त्या साठी रस्त्यावर लोकांचे प्रश्न घेवून जाणे , अन्य पक्षांशी संबंध वाढवणे या सगळ्या गोष्टी करण्याची हा पक्ष उमेद घालवून बसला आहे. २०१४ पासून राहुल गांधी यांचे नेतृत्व पूर्ण पणे अयशस्वी ठरले असले तरी ते काँग्रेसजन मान्य करीत नाहीत. हे कॉंग्रेसजन म्हणजे सगळे दुद्धाचार्य आहेत. जे वयोवृद्ध झाले आहेत व ज्यांची लोकांमध्ये जावून काम करायची क्षमता कधीच नव्हती . पण लोकांमध्ये काम करणारे तरुण व तडफदार नेते या तथाकथित श्रेष्ठींच्या नाकर्तेपणामुळे हतबल व निराश झाले आहेत. त्यांना या पक्षात आपले भवितव्य दिसत नाही. इतकी वर्षे कॉंग्रेस चे चालून गेले कारण कॉंग्रेस ला पर्याय नव्हता आणि तो पुढे आल्यानंतर कॉंग्रेस ची अवस्था दयनीय झाली. आणि या पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढेल असे राहुल गांधी यांचे नेतृत्व नाही हे अधोरेखित झाले आह...