Posts

Showing posts from July, 2020

सुदृढ व सशक्त लोकशाही साठी

सध्या कॉंग्रेस पक्षाची चालू असलेली वाताहत पाहत असताना अनेक जण असा सूर आळवू लागले आहेत की लोकशाही साठी सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष हवा आणि एक जुना व देशव्यापी पक्ष म्हणून ती जबाबदारी कॉंग्रेस ची आहे.. पण आपला पक्ष वाढवणे व त्याला पूर्वीचे दिवस आणून देणे , त्या साठी रस्त्यावर लोकांचे प्रश्न घेवून जाणे , अन्य पक्षांशी संबंध वाढवणे या सगळ्या गोष्टी करण्याची हा पक्ष उमेद घालवून बसला आहे. २०१४ पासून राहुल गांधी यांचे नेतृत्व पूर्ण पणे अयशस्वी ठरले असले तरी ते काँग्रेसजन मान्य करीत नाहीत. हे कॉंग्रेसजन म्हणजे सगळे दुद्धाचार्य आहेत. जे वयोवृद्ध झाले आहेत व ज्यांची लोकांमध्ये जावून काम करायची क्षमता कधीच नव्हती . पण लोकांमध्ये काम करणारे तरुण व तडफदार नेते या तथाकथित श्रेष्ठींच्या नाकर्तेपणामुळे हतबल व निराश झाले आहेत. त्यांना या पक्षात आपले भवितव्य दिसत नाही. इतकी वर्षे कॉंग्रेस चे चालून गेले कारण कॉंग्रेस ला पर्याय नव्हता आणि तो पुढे आल्यानंतर कॉंग्रेस ची अवस्था दयनीय झाली. आणि या पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढेल असे राहुल गांधी यांचे नेतृत्व नाही हे अधोरेखित झाले आह...

भय न उरले मृत्यूचे आता

मृत्यूचे चे भय नाही हे जरा ऐकायला आणि पटायला अवघड आहे. अटळ असलेला मृत्यू हा मनाच्या कोपर्यात सदैव कुठेतरी दबा धरून बसलेला असतो आणि आपण तो विषय टाळतोच. याचे कारण म्हणजे मनात त्याच्या बद्दल असलेली सुप्त भीती आणि  आपली जीवनासक्ती यामुळे आपण त्या विषयापासून दूर पळत राहतो. पण परवा फेसबुक वर एक धनंजय केशव केळकर या नावाने आलेली एक पोस्ट वाचली. त्यात त्यांनी एका जगप्रसिद्ध डॉक्टर च्या बोलण्याचा हवाला दिला त्यात ते म्हणतात की त्यांनी किमान २०० जणांचा मृत्यू बेडच्या बाजूला बसून पहिला होता.  ते म्हणतात  -" तीव्र हार्ट attack, मोठा जीवघेणा अपघात, किंवा वयोमानाने आलेला नैसर्गिक मृत्यू या तीन गोष्टी सोडल्या तर माणसाची जो पर्यंत जगायची इच्छा असते तो पर्यंत तो जगतो. आणि एकदा आता आपण मरावे किंवा मारणार असे ठरवले की कुणी त्याला वाचवू नाही शकणार. (अर्थात किती तरी विकलांग मृत्यू ची वाट पाहत जगात असतात हे पण वास्तव आहे पण तो आजचा विषय नाही) ते म्हणतात करोनाने आपण मारणार ही भीती सोडून द्या.रक्तातील प्राणवायूची पातळी लक्षात न येत खूप खाली गेली तरच मृत्यूची शक्यता असते. बाकी सगळे बरे होतातच. ...

असा पण उघड गनिमी कावा

गेल्या आठवड्यात मी प्रधान मंत्री कार्यालयाला एक मेसेज केला व त्यात असे लिहिले होते की महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून आता केंद्राने महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा. पण हे लिहिताना मला काही मर्यादा पण दिसत होत्या. पोलीस आता दमले आहेत त्यांच्या मदतीसाठी लष्कर किंवा निमलष्कर बोलावणे आवश्यक आहे . पण राज्य सरकारने जर मागणी केली तर केंद्र ते पाठवू शकते. इथे महाराष्ट्र सरकार चा आडमुठेपणा व इगो आड येतो. आता दिल्ली वाचवण्यासाठी सर्व मतभेद  बाजूला ठेवून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मदतीसाठी गृहमंत्री अमित शाह यांना साकडे घातले आणि मग दिल्ली सरकार, केंद्र सरकार, तीन महापालिका यांच्या कार्यक्षेत्रात सुसूत्रता आणून कृती सुरु केली. हे महाराष्ट्रात पण घडू शकले असते. कारण महाराष्ट्र शासन, मुंबई व इतर (ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भायंदर ) महापालिका यांच्यात सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे प्रशासन यंत्रणा हलवणे आवश्यक आहे पण महाराष्ट्र शासन ढिम्म आहे. त्यांना हे सरकार चालवण्यात रस नाही पण ते वाट पाहत आहेत की केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावेल व आपण यातून बाहेर पडू. पण बहुमत आहे तो...

बसंत है आया

Image
 (सदर लेख एप्रिल च्या उत्तमकथा साठी लिहिला होता पण मध्ये तीन महिने अंक निघू शकला नाही म्हणून जुलै मध्ये प्रसिद्ध झाला.) चैत्र पाडव्याला ऋतू चक्रातील पहिला ऋतू वसंत याचे आगमन होते. पानगळी नंतर रुक्ष झालेल्या वृक्षांना पालवी फुटते आणि हिरव्या गार वृक्षांना रंगी बेरंगी फुलांनी डवरलेले पाहताना मन प्रफुल्लीत होते. गोठवणारा हिवाळा सरून पुन्हा धरतीला उष्ण धुमारे फुटू लागतात. संगीतात या ऋतूचा अविष्कार दाखवणारा राग म्हणजे राग बसंत. ललितलवंगलतापरिशीलन कोमल मलय समीरे ही कवी जयदेव यांची अष्टपदी म्हणजे वसंत ऋतूचे सुंदर वर्णन. वसंत ऋतूतील नवी पालवी आणि संगीतातील बसंत राग यांचे अतूट नाते सर्वमान्यच आहे. या रागाचे यथार्थ वर्णन करणारी बसंत रागातील चीज पंडित जसराज गातात- और राग सब बने बाराती, दुल्हा राग बसंत मदन महोत्सव आज सखी री, बिदा भयो हेमंत. वसंत ऋतूत आंब्याच्या मोहोराचा मादक वास आमराईत दाटून राहतो. गुलमोहर केशरी आणि तांबड्या रंगांची उधळण करीत असतात, कोकीळ कुहू कुहू गात असतो.अंगणी गुलमोहर फुलला या गदिमांच्या गाण्यातील विरहिणी म्हणते –वसंत आला ,याल तुम्ही ही कोकीळ कुजबुजला. ऋ...

कॉंग्रेस ची पावले विघटनाकडे

Image
हा मथळा माझा नाही तर दिनांक २९ जून च्या महाराष्ट्र टाईम्स मधील सुनील चावके यांच्या लेखाचा आहे. गेली अनेक वर्षे ते दिल्ली मधील घटनांवर दर सोमवारच्या अंकात लिहित असतात. मी त्यांच्या लेखनाचा चाहता होतो पण जसे मोदी सत्तेत आले त्यांच्या लेखनाचा सूर बदलला. पण नंतर त्यांचे लेखन फार एकांगी होऊ लागले . त्यामुळे त्यांचा लेख म्हणजे मोदी विरोध व कॉंग्रेस समर्थन हे समीकरण झाले. पण मिडिया मध्ये असे चालतेच . पण सोमवारच्या अंकातील लेख हा नुकत्याच कॉंग्रेस कार्यकारिणीचा वृत्तांत व त्यावर टिपण्णी असा आहे. आज कॉंग्रेस ची अवस्था बिकट आहे. कॉंग्रेस हा एक देशव्यापी पक्ष असून त्याला देशभरात काही प्रमाणात निश्चित समर्थन आहे व सुदृढ लोकशाही साठी कॉंग्रेस देशात असणे आवश्यक आहे हे सगळे मान्य करतात कारण देशव्यापी देशाचा दुसरा पक्ष नाही . या पक्षाला स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी आहे व स्वातंत्र्योत्तर काळात या देशात सत्ता राबवण्याचा अनुभव आहे. या पक्षाचे व देशाचे नेतृत्व एका परिवारातील सदस्यांनी केले ही पक्षाची ओळख आहे व तोच आज त्याचा कमकुवतपणा ठरला आहे. कॉंग्रेस चे लहानपणापासून जाणवलेले सामर्थ्य...