आक्रमक मुस्लीम समाज संदर्भात
गेले काही महिने शाहीन बाग आंदोलन किंवा दिल्लीत नुकत्याच उसळेल्या दंगली यामुळे मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे अशी चर्चा सुरु आहे. शाहीन बागrदोलन हे शांततापूर्ण सी ए ए विरोधात होते असा प्रचार करण्यात आला. जरी हे आंदोलन रस्ते अडवून झाले तरी ते चिघळू दिले गेले नाही. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर त्यातील राजकीय हवा निघून गेली आणि राजकीय नेत्यांनी तिथे जाणे बंद केले. इथे आंदोलकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि काहीच पदरात न पडता आंदोलन मागे घ्यावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण या आंदोलकांच्या पुरस्कर्त्यांना हा विषय संपवायचा नव्हता. संसदेने केलेला हा कायदा मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. आणि हा कायदा हे निमित्त होते. याचे मूळ २०१९ साली नरेंद्र मोदी यांनी पुन्हा निर्विवाद सत्ता मिळवली याच्यात होते. सगळ्या विरोधकांना नैराश्याने ग्रासले होते. वास्तविक मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड , महाराष्ट्र येथील विधान सभांतून भाजपची सत्ता गेली होती.तेथील निकालांचा व्यवस्थित अन्वयार्थ लावून कॉंग्रेस ला पुनरुज्जीवीत व्हायची संधी होती. पण त्यासाठी देश पातळीवर संघटनात्मक कम करून सू...