वर्ष सरले
वर्ष सरले आज ३१ डिसेंबर म्हणजे वर्षाखेर म्हणजे रुक्ष भाषेत भिंतीवरील कॅलेंडर बदलाचा दिवस. पण हा बदल नवीन वर्षाचे स्वागत म्हणून उत्साहात साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे सगळ्यांना नेहेमीच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा हवा असतो आणि म्हणून असे सण, उत्सव साजरे केले जातात . याला पौराणिक संदर्भ पण आहे. रामायण काळात सीता त्यागानंतर रामराज्य सुरळीत सुरु होते.पण तेच तेच पण आणि जीवनातील रुक्षपण यामुळे प्रजा उदास होती असा रामाला अहवाल मिळाला . व राजसभेत यावर असे ठरले की रामाने राजसूय यज्ञ करावा म्हणजे प्रजाजन हा उत्सव साजरा करतांना आनंदित होतील. तसेच सौभद्र नाटकात पण नारद लग्नाला जातो मी या गाण्यात म्हणतो - न मिळे अशी मौज पहावया पुन्हा . असर हे सण व उत्सवाचे महात्म्य. या निमित्ताने नवीन वर्षात संकल्प केले जातात.मी सहसा असे काही ठरवत नाही पण यंदा या ब्लॉगच्या निमित्ताने दिसामाजी काही लिहित जावे असा मानस आहे. म्हणजे सक्ती नाही .एखाद्या दिवशी काही सुचले नाही तर नाही लिहायचे . पण अशी शक्यता कमी कारण लिहायला उद्युक्त करणारी घटना दिवसात घडली नाही असे सहसा होत नाही .आणि तसे न झाल्यास सरलेल्...