Posts

Showing posts from August, 2020

तम निशेचा सरला

Image
रात्र आणि अंधार यांचे अतूट नाते असते. किंबहुना अंधार पडू लागला के रात्र आली किंवा रात्र झाली की अंधार पडणार हे गृहीतच असते. पण रात्र हा शब्द तितकासा भयावह वाटत नाही जितका अंधार वाटतो. अंधार या शब्दात एक नकारात्मकता आहे. पण रात्र मात्र सुंदर वाटते. आणि रात्र म्हटली की अनेक गाणी आठवतात. चोरी चोरी या चित्रपटातील ये रात भिगी भिगी हे गाणे आठवते.तो राजबिंडा राज कपूर आणि त्याच्या बरोबर नर्गिस . शंकर जय किशन यांच्या सुरावटी. , मन्ना डे यांचा आवाज. आणि कृष्ण धवल चित्रणाच्या मर्यादा असून सुद्धा पोषक असे चित्रण. हे गाणे ऐकणे म्हणजे खूप तरल अनुभव आहे . यात अंधाराचा कुठे मागमूस ही नाही . रात्र आणि विरह यांचे पण असेच आहे. कुणी म्हणतात विरहात रात्र मोठी प्रेमी जनांस वाटे. जेव्हा   श्रावणधारा बरसत असतात आणि येणारा प्रियकर आला नाही की विरहात झुरणाऱ्या प्रेमिकेची अवस्था या गाण्यात किती छान मांडली आहे.. रिमझिम झरती श्रावण धारा धर्तीच्या कलशात  प्रियावीण उदास वाटे रात. बरस बरस तू  मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम  बरस असा की प्रिया न जाईल मा घा ये आकाश. म्हणजे कवी म्हणतो इत...

मंदिर : राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक

Image
आज अयोध्येत श्रीराम मंदिराच्या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण धार्मिक पद्धतीने केले. आणि अनेक वर्षे अनेक वाद , कोर्टबाजी यात अडकलेला हा प्रकल्प मार्गी लागला. देशात बहुतेक लोकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्रभू रामचंद्र हा देशवासीयांच्या आस्थेचा विषय आहे आणि प्रभू रामचंद्र हे आयोध्येत जन्मले अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे भारताच्या एकात्मकतेसाठी प्रभू रामचंद्र हा महत्वाचा दुवा आहे. अनेक मोगल आक्रमकांनी या देशात सत्ता स्थापन केल्यानंतर येथील श्रद्ध्स्थाने व मंदिरे यांचा विध्वंस करून तेथे मशिदी उभारल्या हे वास्तव आहे. आयोध्येत पण राम जन्मभूमीच्या जागी असलेले भव्य मंदिर उध्वस्त करून तेथे मशीद उभारली गेली व तिला तत्कालीन मोगल सम्राट  बाबर याचे नाव दिले गेले. त्या परिसरात एक मंदिर होते ते बंद होते. ते पंतप्रधान राजीव गांधी यांनी उघडायला लावून दिवा लागेल अशी सोय केली. पुढे विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीत राम मंदिर व्हावे या साठी आंदोलन सुरु केले .त्याच्या जन जागृतीसाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी द्वारका येथून आयोध्येपर्यंत रथ यात्रा काढली . त्याचे ...

नाविन्याचा शोध

नवीन गोष्टींचे प्रत्येकालाच अप्रूप असते. कारण जे आहे ते माहित झालेले असते त्यातील कुतूहल संपलेले असते मग साहजिकच नवीन काहे मिळाले तर हवेच असते. पण यात नाविन्य हे किती आहे , किती टिकणारे आहे हे पण महत्वाचे असते. एखाद्या लहान मुलाला जर नवीन खेळणे दिले तर तो त्याच्याशी थोडा वेळ खेळेल , कदाचित कुतूहलापोटी ते मोडून टाकेल मग त्यातील नाविन्य हे खूपच क्षणभंगुर ठरते. नवीन आणलेल्या कपड्यांचे नाविन्य पण ते एकदा घालेपर्यंत टिकते. तर काही नवीन गोष्टी ह्या रुळून जातात व त्यातील नाविन्य संपते. एखादा कलाकार गायक एखाद्या नवीन रागाची निर्मिती करतो आणि तो जर आवडला तर रसिक त्याचे स्वागत करतात, इतर कलाकार तो राग आत्मसात करून सादर करतात आणि मग तो राग नवीन राहत नाही. अर्थात नाविन्य किती काळ टिकणार हे त्या त्या गोष्टीवर अवलंबून असते. एका कार्यक्रमात नृत्य करता करता पंडित बिरजुम्हाराज म्हणाले आत्ता काही मुद्रा , जागा सुचतात व त्या पेश केल्या जातात पण त्या तिथेच राहून जातात. एखादे गाणे सादर करताना कलाकार अनेक नवीन जागा घेतो पण ती त्या त्या वेळेची निर्मिती असते. एखादी निर्मिती उत्कृष्टतेकडे नेण्यासाठी त्यात अन...