तम निशेचा सरला
रात्र आणि अंधार यांचे अतूट नाते असते. किंबहुना अंधार पडू लागला के रात्र आली किंवा रात्र झाली की अंधार पडणार हे गृहीतच असते. पण रात्र हा शब्द तितकासा भयावह वाटत नाही जितका अंधार वाटतो. अंधार या शब्दात एक नकारात्मकता आहे. पण रात्र मात्र सुंदर वाटते. आणि रात्र म्हटली की अनेक गाणी आठवतात. चोरी चोरी या चित्रपटातील ये रात भिगी भिगी हे गाणे आठवते.तो राजबिंडा राज कपूर आणि त्याच्या बरोबर नर्गिस . शंकर जय किशन यांच्या सुरावटी. , मन्ना डे यांचा आवाज. आणि कृष्ण धवल चित्रणाच्या मर्यादा असून सुद्धा पोषक असे चित्रण. हे गाणे ऐकणे म्हणजे खूप तरल अनुभव आहे . यात अंधाराचा कुठे मागमूस ही नाही . रात्र आणि विरह यांचे पण असेच आहे. कुणी म्हणतात विरहात रात्र मोठी प्रेमी जनांस वाटे. जेव्हा श्रावणधारा बरसत असतात आणि येणारा प्रियकर आला नाही की विरहात झुरणाऱ्या प्रेमिकेची अवस्था या गाण्यात किती छान मांडली आहे.. रिमझिम झरती श्रावण धारा धर्तीच्या कलशात प्रियावीण उदास वाटे रात. बरस बरस तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम बरस असा की प्रिया न जाईल मा घा ये आकाश. म्हणजे कवी म्हणतो इत...