Posts

Showing posts from January, 2020

हॉस्पिटल

लहान पणी एक गाणे ऐकले होते पडू आजारी मौज हीच वाटे भारी. यात आजारी पडल्यावर आपल्याकडे सर्वांचे कसे लक्ष जाते, आपली कशी काळजी घेतली जाते, शाळेत न जाता घरी राहायला मिळते असे वर्णन होते. त्या बदल्यात फक्त कडू औषधाचा घोट गिळावा लगे. अर्थात ते आजार पण साधा ताप, खोकला असे किरकोळ असायचे. आम्ही ह्या सरकारी वसाहतीत राहायचो तिथे एक दवाखाना होता. तिथे एक डॉक्टर येत असत व एक वैद्य नावाचे कंपौंडर असत. कधी इंजेक्शन ची वेळ आली तर ते वैद्य खुप्प दुखवायचे पण डॉक्टर हळुवार हाताने न दुखवता द्यायचे .(त्यांचे आडनाव बहुतेक मुळे होते) मोठ्या हॉस्पिटलचा अनुभव पहिल्यांदा माझा हात मोडला तेव्हा आला. संध्याकाळी हात मोडला तेव्हा मुळे डॉक्टरनी एक इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी मी व माझे वडील मुंबईला जे जे हॉस्पिटल मध्ये आलो. तिथे पण एक इंजेक्शन व हाताला प्लास्टर घातले. त्या पेक्षा लक्षात राहिले ते वडिलांबरोबर हॉटेल मध्ये जाऊन जेवण केले ते.. नंतरचा हॉस्पिटलचा अनुभव म्हणजे काही कारणाने आईला दोन दिवस हॉस्पिटल मध्ये (ते नागपूरचे हॉस्पिटल बहुतेक मेयो हॉस्पिटल होते) राहावे लागले तिला भेटायला गेलो होतो. नंतर मुंबईला अ...

अवघा रंग एक झाला - एक अनुभूती -अबाचा ढोल

अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तूपण गेले वाया पाहता पंढरीच्या राय नाही भेदांचे ते काम पळोनि गेले क्रोध काम देही असोनि विदेही सदा समाधिस्त पाही पाहते पाहणे गेले गेले दूरी म्हणे चोखियाची महारी संत चोखामेळा हा अभंग गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी रसिकांच्या मनात रुजवला. त्यांचा आर्त सूर, तन्मयता,या मुळे हा अभंग ऐकल्यानंतर एक सुकून मिळतो. रसिक त्याच्याशी तादात्म्य पावतात.   तो ऐकता ऐकता समाधी चा अनुभव येतो. मन एका विलक्षण अवस्थेत जाते. डोक्यातील विचारांचे काहूर शांत होते असा सगळा अनुभव म्हणजे हा अभंग. हा अभंग त्यांच्या कोणत्या मैफलीत ऐकायचा योग्य काही आला नाही . ऐकले ते ध्वनी मुद्रण. या अभंगाने अनेक गायकांना भुरळ घातली आहे . भरत बेलवल्ली, आर्या आंबेकर , महेश काळे , आरती अंकलीकर ही काही नावे. हाच अभंग जेव्हा सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात शरयू दाते हिने सादर केला. तिने पण पूर्ण तन्मयतेने हा अभंग सादर केला व तो ऐकताना सगळा श्रोतृवृंद अवाक झाला. किशोरी ताई असा अभंग सादर करतात तेव्हा त्या मागे त्यांची अनेक वर्षांची साधना व तपश्चर्या असते आणि त्या मुळे त्यांचे गाणे अ...

विम्याचा फसवणुकी साठी वापर

इन्शुरन्स म्हणजे विमा आपण सुरक्षितते साठी घेतो. आपले आयुष्य, वाहन, घर, प्रवास, आरोग्य या सारख्या आपतींमध्ये दिलासा मिळावा म्हणून आपण विमा घेतो. अर्थात त्यामुळे विमा म्हटल्यावर आपण थोडे भावनिक होतो आणि व्यवहार बाजूला ठेवतो. नेमक्या याच गोष्टीचा फायदा काही भामटे घेऊन आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. सर्वांच्या माहितीसाठी आलेले तीन  अनुभव द्यावेसे वाटतात.  एकदा मी घरी नसताना फोन आला . पत्नीने तो घेतला. फोन वरचा माणूस सांगत होता की तो हेंद्राबाद येथून बोलत आहे. त्याचे असे म्हणणे होते की माझ्या वडिलांनी माझ्या नवे एक पोलिसी घेतली होती . ती पोलिसी आता देय झाली असून तिची रक्कम २० लाख रुपये मिळण्यासाठी तुम्ही मागणी करा. ही मागणी ऑन लाईन असून त्याच्या प्रोसेसिंग साठी तुम्हाला २५००० रुपये क्रेडिट कार्ड वर भरावे लागतील . पण मी घरात नसल्याचे सांगून पत्नीने फोन बंद केला.यातील वस्तुस्थिती अशी की माझे वडील १९८४ मध्ये निवृत्त झाले होते आणि २००१ मध्ये त्यांचे निधन झाले. आम्ही कायम संपर्कात असल्याने त्यांची आर्थिक स्थिती माहित होती आणि ते हैद्राबाद ला जाऊन पोलिसी घेतील हे शक्यच नव्हते....

जाहिरातींचे युग

सध्या हे युग जाहिरातीचं युग आहे असं म्हटलं जातं आणि ते खरं पण आहे. आज आपण पाहतो की जाहिराती या किती चकाचक असतात. लहानपणी जाहिराती या होर्डिंग्स, वर्तमान पत्रे, मासिके व रेडिओ सिलोन वर आणि चित्रपट गृहात सिनेमाच्या आधी असायच्या. १९६८-६९ च्या सुमारास विविध भारतीने जाहिरात विभाग सुरु केला. या शिवाय जाहिराती या काही कार्यक्रमांच्या निमित्ताने निघणाऱ्या स्मरणिकेत असायच्या, यात साधारण ९० % जाहिराती व १०% मजकूर असायचा . या संदर्भात एक आठवण आहे. वडिलांच्या संस्थेच्या मदती साठी पु ल देशपांडे यांच्या असा मी असा मी चा प्रयोग होता. ही गोष्ट १९६६ मधील आहे. त्यासाठी तिकिटे खपवणे वगैरे चालू होते. एके दिवशी मला वडील टॅक्सी ने घेऊन गेले . नाटकाचे दोन बोर्ड पोचवायचे होते व महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रयोगाची जाहिरात द्यायची होती. त्या नंतर त्यांच्या बोलण्यात कधीतरी परत जाहिरातीचा विषय आला. कुणीतरी जाहिराती बद्दल बोलत होतं. त्यांना वडील म्हणाले ताबडतोब जा, पाहिजे तर टॅक्सी करून जा. तेव्हा मी विचारले जाहिरात आपण देऊन आलो की.तेव्हा ते म्हणाले ही जाहिरात वेगळी. म्हणजे स्मरणिकेसाठी होती. प्रत्यक्ष ती स्मरणिका...

प्रवास आणि सहली

प्रवास म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती पत्र्याची ट्रॅक, होल्डऑल , फिरकीचा तांब्या . आता या वस्तू इतिहासजमा झाल्या आहेत म्हणजे त्यांची जागा चाके असलेल्या ब्यागा, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, सॅक या गोष्टींनी घेतली आहे. प्रत्येक माणसाला प्रवासाची आवड असतेच.आणि जर प्रवास करायला जमले नाही तर ती भूक आपण प्रवास वर्णने वाचून अंशतः: भागवतो. वारसाईच्या गोडसे भटजींचा माझा प्रवास १८५७ मधील असल्याने तो ऐतिहासिक महत्वाचा ठरतो . गंगाधर गाडगीळ गोपुरांच्या प्रदेशात मधून दक्षिण भारताचे दर्शन घडवतात तर पु ल आपल्याला जगप्रवास घडवतात. शिवाय धुक्यातून लाल ताऱ्यांकडे , खडक कोरतात आकाश प्रवास वर्णने कशी विसरता येतील.तर गो नी दांडेकर पूर्ण न झालेल्या नर्मदा परिक्रमेचे कुणा एकाची भ्रमण गाथा मध्ये असे वर्णन करतात कि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या परिक्रमेतून पण परिक्रमेची ओढ अस्वस्थ करते.अशीच एक ओळख वासंती घैसास याची . काही जसे हाडाचे शिक्षक, हाडाचे व्यापारी असे असतात तशा त्या हाडाच्या पर्यटक आहेत. त्यांची प्रवास वर्णने मळलेल्या वाटा सोडून असल्याने जास्त भावतात. मी माझ्या काही सहलींचे नियोजन करताना त्यांचा सल्ला घेण...

पद्मश्री सय्यद भाई -एक सच्चा कार्यकर्ता

काल प्रजासत्ताक दिनानिमित्त जे पद्म पुरस्कार जाहीर झाले त्यात एक नाव होत सय्यद भाई  यांचे. या नावाचा समावेश मनाला सुखवून गेला. ते काही माझ्या परिचयाचे नाहीत. किंवा त्यांच्या कार्याशी पण माझा काही संबंध नाही . तरीपण एका सच्च्या कार्यकर्त्याचा हा सन्मान सुखवून गेला. १९७२-७३ मध्ये समान नागरी कायदा या विषयावर माहिती घेण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात एक  बैठक घेतली होती आणि त्या साठी साधना साप्ताहिकाचे तत्कालीन संपादक व लेखक यदुनाथ थत्ते यांना निमंत्रित केले होते आणि त्या वेळी ते सय्यद भाईना घेवून आले होते. स्व. हमीद दलवाई यांच्या सोबत ते पुण्यात मुस्लीम सत्यशोधक समाजाचे काम करत होते. त्या नंतर मुस्लीम लीग चे बनातवाला यांनी विधान सभेत वंदे मातरम म्हणणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्याला त्यावेळी समाजाच्या विविध स्तरातून विरोध झाला होता. विद्यार्थी परिषदेतर्फे या विषयावर एक सर्वपक्षीय सभा घेण्यात आली होती त्या वेळी ते स्व ग प्र प्रधान यांच्या समवेत आले होते. त्यांनी त्यावेळी बनातवाला यांचे मत हे सर्व मुस्लिमांचे प्रातिनिधिक मत नाही असे प्रतिपादन केले होते. त्यांचा मूळ पि...

सुटीचा दिवस i

सुटीचा दिवससगळ्यांनाच हवा हवासा वाटतो. नेहेमीच्या चक्रातून ती एक सुटका असते. शाळेत साप्ताहिक सुटी रविवारी असायची . आणि तिची चाहूल शनिवारीच लागायची. कारण शनिवारी शाळा सकाळची असायची आणि ती पण अर्धा दिवस. त्यामुळे शनिवार पण खास असायचा. यात एक अडचण असायची ती म्हणजे गृहपाठ कधी करायचा याची . काही हुशार व अभ्यासू मुले तो शनिवारीच उरकून टाकायची . पण शनिवारी जरा कुठे सुटीचा माहोल तयार होत असताना अभ्यास कुठे? आणि रविवारी तर प्रश्नच नाही . तेव्हा सोमवार उजाडला की गृहपाठ करायचा पोटात गोळा यायचा आणि घरून त्याबद्दल असं शेवटच्या वेळेपर्यंत ताणल्या बद्दल बोलणी पण खावी लागायची. पण गेली ती शाळेची व अभ्यासाची वर्षे. कॉलेज मध्ये रविवारी सकाळी NCC असायची . शिवाय होस्टेल वर राहत असल्याने कपडे धुवून त्यांना इस्त्री करणे, सायकलची मरम्मत . शिवाय मग एखादा चित्रपट पाहणे, फिरायला जाणे वगैरे. पण कॉलेज मध्ये गृहपाठ नसे. पण कॉलेज मुळात थोडा वेळ असल्याने इतर दिवशी पण मजा करता येत असे. शिवाय दिवाळी, नाताळ, उन्हाळी अशा मोठ्या सुट्या पण असायच्या. पण पुढे विद्यार्थी परिषद , साहित्य चर्चा मंडळ यात सहभाग वाढल्याने कॉलेज म...

राजकीय खोटेपणाचे वास्तव

आजकाल कुणी काय बोलत व काय प्रसिद्ध होत व त्यात काय तथ्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. आणि याला माध्यमे जबाबदार आहेत म्हणजेच ती आपल्या जबाबदारीबद्दल गंभीर नाहीत असेच दिसते.पूर्वी कुणी एखादे विधान पत्रकारांपुढे केले तर त्यावर उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती होत असे. आजकाल काही लोकांच्या बाबतीत त्यांनी काहीही बोलावे व उपस्थित पत्रकारांनी ते बिनबोभाट प्रसिद्ध करायचे अये चालू आहे. बरे कुणी काही बोलले तरी प्रसिद्धी देताना त्याचे तारतम्य पण बाळगले जात नाही आणि आपण काही बोला त्याला प्रसिद्धी मिळते व सनसनाटी निर्माण होते आणि मग ती व्यक्ती जास्त चेकाळून विधाने करतच जाते. मग असा प्रश्न पडतो की माध्यमांना असली सनसनाटी निर्माण करून लोकांचे मनोरंजन करायचे आहे का? पूर्वी राजकारणात क्वचित असे विदुषकी वागायचे. त्यात सत्तरीच्या दशकात राज नारायण हे एक नाव होते. पण ते अपवादात्मक असायचे. पण आता अनेक नेते बर्याच वेळा तसे वागताना दिसतात. गेले काही दिवस रोज पत्रकारांना खाद्य देण्याचे कम नेमाने करत असत व त्यात ते भाजप च्या विरोधात असल्याने चांगली प्रसिद्धी मिळत गेली. आणि महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आपणच आणली असा स...

शिकवता शिकवता

आपण तशी शिकायला सुरुवात जन्मापासूनच करतो. पण रुढार्थाने शिकायला सुरुवात होते ती शाळेत. पण माझ्या बाबतीत शिक्षण घरीच आईने सुरु केले. कारण आम्ही गावाबाहेर राहायचो आणि शाळा दूर होती. तेव्हा बालवर्ग किंवा शिशु शाळा नव्हती तर थेट पहिली. मला वाटत मी फक्त परीक्षेलाच शाळेत गेलो आणि पहिली पार पडली. नंतर मात्र काही कुटुंबे बदली होवून आली आणि मग शाळेत जाणारी एक टीम तयार झाली आणि सर्वांना शाळेत न्यायला आणायला शासकीय बैलगाडीची व्यवस्था झाली आणि शाळा सुरु झाली . प्राथमिक शिक्षण विरार, बसणी,नागपूर इथे झाले आणि या सर्व वर्षी वर्ग शिक्षक शिक्षिका सगळे विषय शिकवत असत. प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक हे माध्यमिक शाळेत सुरु झाले. त्यामुळे प्राथमिक शिक्षक हे बहुरूपी म्हणजे सगळ्या भूमिका वठवणारे असत तर प्रत्येक विषयाचे वेगळे शिक्षक म्हणजे आपापली भूमिका करणारे वाटत. माझे पहिले माध्यमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हाय स्कूल. आमचे वर्गशिक्षक होते ज लु पाटील सर. हे नेहमी पांढरा खादीचा शर्ट घालत. ते मराठी शिकवायचे. ते साभिनय शिकवायचे. त्यामुळे विषय रंगतदार होत असे. हस्त कला विषयात ते सुत कताई शि...

नाचू कीर्तनाचे रंगी.

आज सकाळी प्रवासात बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन ऐकत होतो. दर चातुर्मासात पुण्यात त्यांची प्रवचने होतात पण त्यात एकादशीला ते कीर्तन करतात. त्यांचे कीर्तन हे वारकरी संप्रदायाचे असते. त्याचा एक वेगळा थाट असतो . बाजूला ४०-५० टाळकरी , मृदूंग, तबला , पेटी अशी साथ . रसाळ निरूपण व संगीत यांची मेजवानी असते.एकूण वातावरण भारून गेलेले असते. हा अनुभव मी घेतला आहे. वास्तविक वारकरी संप्रदायाचे कीर्तन आम्हाला नवे. हरदासी नारदीय परंपरेतील कीर्तने लहानपणापासून ऐकलेली.कोकणात गणपती उत्सवात पूर्वी रोज कीर्तन होत असे . जेव्हा वाहतुकीची साधने नव्हती तेव्हा कीर्तनकार बुवा संपूर्ण उत्सव आमच्याकडे मुक्कामाला असत. लहानपणी आधीचे निरूपण काही काळात नसे पण दृष्टांत म्हणून सांगितलेली कथा मात्र ऐकायला मजा येत असे.या कीर्तनात अभंग, भजने, साकी, दिंडी, आर्या, असे विविध प्रकार ऐकायला मिळत. या सगळ्या प्रकारांचा ते निरूपण आणि कथानक पुढे नेण्यासाठी वापर करत. पूर्वी काही कीर्तनकार पायात चाळ बांधून चक्क नाचत पण असत ऐकले आहे. म्हणून असे म्हणायची परंपरा आहे नाचू कीर्तनाचे रंगी. अनेक कीर्तनकारांची कीर्तने ऐकली पण प्रत्यक...

कविता साद घालते

कविता नुसती वाचून चालत नाही. ती  भावायला लागते. तिने वाचकाच्या मनाची तार छेडायला हवी. थोडे तरी भाव विश्वात डोकवायला हवे. नाहीतर गद्य उतारे आणि कविता यात फरक तो काय? कविता आपल्यावर प्रसन्न व्हावी म्हणून कवी तिला साद घालतो. कवितेला किंवा ती जिच्यामुळे स्फुरते त्या प्रतिभेला. ती कधी , कशी आणि कुठे भेटेल , साद देईल ते सांगता येत नाही. कवी अनिल याच अवस्थेवर लिहितात- आज अचानक गाठ पडे भलत्या वेळी भलत्या मेळी असता मन भलतीच कडे ते असे ही लिहून जातात - नयन वळविता , सहज कुठेतरी एका एकी तूच पुढे आज अचानक गाठ पडे. दचकूनी जागत जीव निजेतच क्षणभर अंतर्पट उघडे गूढ खूण तव कळून नाकळून भांबावून मागे मुरडे निसटुनी जाई संधीचा क्षण सदा असा संकोच नडे अनिल असे व्यक्त होतात तर व्याकुळ होऊन सुधीर मोघे लिहितात सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का येशील का? मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का हृदयात आहे प्रीत अन ओठात आहे गीत ही तू प्रेमगाणे छेडणारा सूर तू होशील का जे जे हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले तरीही उरे काही उणे तू पूर्तता होशील ...

आयुष्याचे नेटवर्क

वेगवेगळ्या ठिकाणी असलेले माहितीचे स्त्रोत, प्रोसेसर्स, त्या माहितीवर वेगवेगळ्या ठिकाणी होणार्या प्रक्रिया या सगळ्या जोडणाऱ्या यंत्रणेला नेटवर्क म्हणतात. म्हणजे उत्पादनांचे आरेखन (designing) एका ठिकाणी , त्याबरहुकूम उत्पादन करणे, त्या उत्पादनाच्या सगळ्या नोंदी, त्या उत्पादनांसाठी लागणाऱ्या मालासाबंधीची माहिती, त्याच्या ऑर्डर्स, पुरवठा व त्याच्या नोंदी , आलेल्या मालाची नोंद, त्याचा साठा, आलेल्या मालाच्या बिलांची नोंद व त्यांची पेमेंट,आर्थिक बाबतीतील नोंदी , तयार झालेल्या मालाची ग्राहकांकडे पाठवणी, त्यच्या नोंदी, देयके, त्यांची वसुली,सोबत कामगारांची हजेरी व त्यांची पगारपत्रके यांच्या नोंदी. ढोबळ मानाने एखाद्या उद्योगाचे हे असे चक्र असते आणि या चक्राला जोडणारी एखादी यंत्रणा असते त्यात सुसूत्रता आणण्यासाठी एखादी संगणकीय प्रणाली असते. यात सामान्यपणे पुढील विभागांचा सहभाग असतो. उत्पादन (production) , वित्त (Finance), माल (material) , विक्री (sales). आणि यामध्ये सुसूत्रता आणण्या साठी प्रभावी यंत्रणा लागते.अशा यंत्रणा सतत विकसित होत असतात आणि त्यामुळे उत्पादनात सुसूत्रता येते व अनावश्यक तोटे ...

लग्न -एक खुशीने केलेला आतबट्ट्याचा व्यवहार

मागच्या आठवड्यात एक चर्चा सोशल मिडीयावर सुरु होती की लग्न कशाला करायचे? त्यावर बरीच चर्चा उलट सुलट सुरु होती. एक मुद्दा त्यात असा होता की मुले जन्माला घालणे म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता आहे का? या सगळ्या चर्चेत लग्न संस्था ही आपल्या व्यक्तीमत्वाचा, अभिव्यक्तीचा संकोच करते असा सूर होता. एकूण विवाहसंस्थेची बंधने जाचक वाटत आहेत असे जाणवले. यात एक गोष्ट नक्की आहे की मुलींची नोकरी, करिअर ,संसार , मुलांचे संगोपन ,शिक्षण या सगळ्यात प्रचंड दमछाक होते आहे. सद्याच्या स्पर्धात्मक जगात नोकरी ही सोपी राहिली नाही. ती अधिक वेळ मागते , त्यात तणाव वाढले आहेत. कमचे तास किती यावर बंधने नाहीत आणि घरी गेल्यावर पण कॉल असू शकतात. गेल्या जानेवारीतच शेवटच्या दिवशी एक ओर्डर फायनल करायची होती. वाटाघाटी सुरु होत्या. रात्री साधारण १० नंतर फायनल झाल्यावर ऑर्डर प्रोसेस करायला घेतल्यावर संगणकीय समस्या उभी राहिली. पावणे  अकरा वाजता संबंधित मुलीच्या घरी फोन करून तिला उठवले , तिचा लेप टोप उघडायला लावला व ती समस्या निराकरण करून घेतली तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते.हा सगळा प्रकार जरा अमानुष वाटणारा होता. जरी द...

पार्टीतले संवाद

"अरे कधी भेटायचं ? बसूया एकदा." "विचार सगळ्यांना . नाहीतर ग्रुपवर टाक मेसेज." "मित्रहो, सगळ्यांच्या खास आग्रहास्तव विशेष बैठक नेहेमीच्या ठिकाणी व नेहेमीच्या वेळी आयोजित केली आहे. सर्वांनी अनमान न करता वेळेवर उपस्थित राहून तृष्णा व क्षुधा यांचे स्वखर्चाने शमन करावे ही विनंती. का मेसेज फक्त ग्रुपवर गोपनीयतेसाठी टाकला आहे. " "अरे या या , सगळे अगदी वेळेवर म्हणजे सगळेच तहानलेले दिसताहेत. आपले नेहेमीचे दोन न पिणारे  मेम्बर नंतर फक जेवायला येणार असतील . " "असूदे , चला आपण सुरुवात करूया. वेळ वाया नको जायला. " " हो ना , सूरज डूब गाय ही अब हाथमे जाम होना ही चाहिये " " अहो महाराज , घशाखाली उतरायच्या आधीच राष्ट्रभाषेत पोचलात की." " छे छे , घशाखाली घोट उतरला की मग डायरेक्ट साहेबाच्या भाषेत हा , " " ठीक आहे कोणी कोणती पण भाषा वापरू दे , आधी सुरुवात तर करूया." "काय घेणार?" " मी बिअर." "अरे थंडी केवढी पडली आहे . आणि बिअर कसली घेतो?" " नाही , गेली कित्येक वर्षे मी ब...

हवा हवासा हिवाळा

पाऊस संपता संपता एखाद्या सकाळी सर्वत्र धुके पसरलेले दिसते आणि आपण म्हणतो संपला आता पावसाळा आणि तिथेच चाहूल लागते हिवाळ्याची. साधारण ऑक्टोबर संपता संपता ही चाहूल लागते. त्याच सुमारास दिवाळी असली की पहाटेच्या अभ्यंग स्नानाची मजा काही औरच. साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणार हिवाळा फेब्रुवारी च्या पहिल्या पंध्रवड्यापर्यंत टिकतो. प्रत्येक ऋतूची एक खासियत असते तशी हिवाळ्याची एक खासियत आहे. आपल्यासारख्या उष्ण कटिबंधात राहणार्यांना हिवाळ्याचे अप्रूप जे शीत कटिबंधात उन्हाळ्याचे व सूर्यप्रकाशाचे असते. आम्हा शहराच्या गर्दीत राहणाऱ्यांना अंगावरचे पांघरुण पुरेनासे झाले की समजायचे की हिवाळा सुरु झाला. दुसरी पण लक्षणे आहेत म्हणजे पाणी गरम होण्यासाठी गिझर जास्त वेळ घेतो. खोबरेल गोठते इ. मग स्वेटर , शाली , हातमोजे बाहेर निघतात. हिवाळ्याचे निसर्गात होणारे बदल शहरातून फारसे जाणवत नाहीत पण रंगी बेरंगी स्वेटर, कानटोप्या,शाली दिसू लागल्या हिवाळा आला हे नक्की. स्वेटर , शाली यांचा महोत्सव पूर्वी जेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रात्री असे तेव्हा पाहायला मिळायचा. आता महोत्सव पण रात्री नसतो आणि...

हे चमत्कारच.

कालचा कलर्स मराठी वरील सूर नवा ध्यास नाव कार्यक्रम. १० वर्षांची श्रावणी मंचावर येते आणि सुरु करते - भय इथले संपत नाही . आम्ही अवाक. ही कवी ग्रेस यांची रचना. ग्रेस यांची कविता समजायला बरंच आयुष्य जगावं लागतं. त्यांच्या रचनांना हात फक्त कवितेची उत्तम जण असणारा संगीतकार म्हणजे बाळासाहेब मंगेशकरच घालू शकतात. ती कविता आत्मसात केल्यावर तिची चाल जन्माला येते. आणि त्यांच्या चाली म्हणजे भल्याभल्या गायकांची -अगदी त्यांच्या बहिणींची पण दमछाक करणाऱ्या असतात असं आशाबाई म्हणाल्या आहेत.तर अशी चाल झाल्यावर भारतरत्न लता मंगेशकर आपली जानओतून ते गीत गातात तेव्हा असं गाणं तयार होतं. आणि असं हे गाणं १० वर्षांची बालिका आपल्या गोड आवाजात गेला लागते तेव्हा आधी आश्चर्य मग कौतुक दोन्ही बाजूला राहतं आणि गाणं पुढे सुरु राहतं.सगळे उपस्थित मंत्रमुग्ध. कवी ग्रेस, बाळासाहेब मंगेशकर व लता मंगेशकर यांनी हे गाणं म्हणजे कैलास शिखर निर्माण केले. कुणा नावागाताची ते पाहून धडकीच भरते. पण ही बालिका ते शिखर लीलया सर करून जाते आणि आपल्याला त्याचे सौन्दर्य दाखवते. गाणं संपल्यावर स्पृहा  श्रावणीजवळ   येऊन तिला फक्त मि...

संक्रमण याने बदल

परवा बोलता बोलता एका मित्राने किस्सा सांगितला. एका प्रशिक्षण कार्यक्रमात विचारले गेले - कुणा कुणाला बदल घडावा असे वाटते? सर्वांनीच हात वर केले. म्हणजे बदल सर्वांना हवा होता. मग दुसरा प्रश्न शब्द फिरवून विचारला- कोण कोण बदलायला (बदल घडवून आणायला) तयार आहेत? यावर सगळे चूप झाले. कुणीच बदलायला तयार नव्हते. एक कठोर वास्तव की बदल सगळ्यांनाच हवा असतो पण बदलायला कुणीच तयार नसते. काय अवघड आहे बदलण्यात? बदल हा निसर्गाचा, प्रकृतीचा स्थायीभाव आहे. रोज उगवणारा दिवस हा वेगळा असतो. सूर्य,चंद्र यांच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या वेळा वेगख्या असतात. आकाशातील ग्रह तारे चांदण्या यांची स्थाने बदललेली असतात किंवा पृथ्वीचा अंश बदलल्याने ते तसे भासत असते पण बदल असतोच. झाडावरच्या कळ्यांची फुले झालेली असतात . कच्ची फळे पिकतात. झाडावरची जीर्ण पाने गाळून पडतात. नवी पालवी फुटते असं असताना मग आपणच का आपल्याला बंधनात जखडून ठेवायचं ? का घाबरतो आपण बदलला सामोरे जायला? सहसा कुणाला आपलं चालू असलेले आयुष्य बदलायला नको असते किंबहुना ती सहज प्रवृत्ती असते. आपण आपल्या कोशात रममाण झालेले असतो. तरीपण आपण कधीतरी सोय म...

स्वप्ने वेचताना

शीर्षक थोडे गोंधळात टाकणारे आहे पण खरंच आपली स्वप्ने वेचावी लागतात. कारण स्वप्ने आपण निद्रेत असताना पडतात आणि जागे झाल्यानंतर विस्मरणात गेलेली असतात. काही वेळा टी आठवतात सगळी किंवा तुटक तुटक. या तुटक तुटक स्वप्नांच्या साखळीचे दुवे जोडणे म्हणजे स्वप्ने वेचणे असे मी म्हणतो. सकाळी एखाद स्वप्न आठवलं तरी आपण त्याचा फारसा विचार करत नाही कारण ते स्वप्न होत आणि आपण वास्तवात आहोत याच आपल्याला भान आलेलं असतं. पण ते फार विचित्र किंवा भयावह असेल तर आपण ते विसरू शकत नाही,त्याची आपण कुठेतरी संगती लावायचा प्रयत्न करतो. किंवा ते कुणाला तरी सांगून आपल्या मनावरचा ताण कमी करायचा प्रयत्न करतो. एखादे स्वप्न चालू असतानाच एकदम जाग येते आणि ते स्वप्न जर भयावह असेल तर आपण हुश्श ते स्वप्न होते तर असे म्हणून सुस्कारा सोडतो.जर जागे व्हायची वेळ पहाटेची किंवा सकाळची असेल तर अशी स्वप्ने खरी होतात असे मानले जाते. स्वप्ने हा कवी लोकांचा वीक पॉईंट असतो. कारण कवितेचं जग हे वास्तवाच्या पलीकडचं , भासरूप असत आणि त्यामुळे कदाचित ते स्वप्नांना जवळचं असतं.त्यामुळे कवींच्या अनेक उपमा वा उपमाने ही स्वप्ने असतात. आता चंद्र हा...

साहित्य(?) संमेलन

काल अखेर साहित्य संमेलनाचे सूप वाजले. ही संमेलने खरे तर साहित्यप्रेमींची पर्वणी असायला हवी पणती गाजतात साहित्यबाह्य विषयांमुळे. भाषणे , परिसंवाद या बाबी जास्त वेळ खातात त्यामुळे निखळ साहित्याचा आस्वाद हा कोपऱ्यात जातो . शिवाय बरेच परिचित भेटतात त्यामुळे भेटीगाठी ,गप्पाष्टके हे पण आलेच. यात चुकीचे काही नाही कारण सहभागी झालेला प्रत्येक जण आपल्याला पाहिजे तास आनंद घेणारच. पण सध्या या मंचाचा उपयोग चुकीचा होताना दिसतोय. संमेलन गाजायला सुरुवात अध्यक्षीय निवडीने होते. ही निवड काही अपवाद वगळता वाद निर्माण करते. या वर्षीच्या अध्यक्षांची निवड झाल्यावर ते ख्रिश्चन धर्मप्रसारक आहेत यावर वाद सुरु झाला. वास्तविक याचाविचार निवड समितीने करायला हवा होता. दिब्रेटो यांचे साहित्य बऱ्याच लोकांना आवडते . पण एक लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आपले साहित्य निर्मिती नाही तर त्यांच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठीचे साहित्य हे साधन आहे. त्यामुळे ते प्रचारकी व प्रबोधनकारी साहित्य आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनापुरते नसावे तसेच ते प्रचारकी व प्रबोधनपर पण नसावे. या दोन्ही गोष्टी कलात्मकतेला मारक ठरतात...

टाळ्या आणि दाद

कुणालाही आपल्या प्रस्तुतीला टाळ्या व दाद मिळाली तर आनंद होतो. नाही म्हटल तरी मूठभर मांस चढतच. एकदा प्रसिद्ध लेखक व पत्रकार वि स वाळिंबे यांच्याकडे बसलो असताना काही लोक त्याच्याकडे आले व आपला परिचय देवू लागले तेव्हा ते म्हणाले - अहो तुम्ही माझा सत्कार केला होता. तेव्हा वाळिंबे यांचे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या वरील पुस्तक प्रसिद्ध झाले होते. आणि बोलताना ते  पुढे अस म्हणाले होते आपला झालेला सन्मान आणि अपमान कुणी विसरत नसत. अतिशय कठोर वास्तव ते एका वाक्यात बोलून गेले. आता हे सगळ आठवायचं कारण म्हणजे परवा यंदाच्या सवाई गंधर्व समारोहात पंडित जसराज यांच्या गाण्याबद्दल बोलणे चालू होते. यंदा मी गेलो नव्हतो पण आधीच एक प्रतिक्रिया ऐकली होती की गाणे अतिशय बेकार झाले. दुसरी प्रतिक्रिया अशीच होती. त्यांनी आपल्या गाण्यातून आजवर जो आनंद रसिकांना दिला आहे तो स्मरून लोकांनी ते गाणे सहन केले. दोन वर्षांपूर्वी मी गेलो होतो त्या वर्षी पण त्यांचा सगळा विलंबित खयाल हा आवाज लागण्यात खर्ची पडला व मग पुढे गाणे झाले. त्या आधी पण एक वर्ष ते आले व गावू शकत नसल्याने त्यांची मुलखात व शिष्यांचे गाणे असा पर्या...

मी सदाशिवपेठी

माझा जन्म सदाशिव पेठेतील. पण सदाशिव पेठेत राहायला येण्यासाठी १७ वर्षे उलटावी लागली. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे सगळे शालेय शिक्षण अखिल महाराष्ट्रात झाले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र पुणे गाठले. कधी न राहिल्यामुळे असेल पण मुंबईत राहून सुद्धा मला पुण्याबद्दल एक सुप्त आकर्षण होते. पुणे विद्यार्थी गृहाच्या सदाचार वसती गृहात स्वस्त दारात राहण्या जेवणाची सोय झाली आणि हे वसतीगृह सदाशिव पेठेत असल्याने माझा मुक्काम सदाशिव पेठेत पडला. त्यामुळे पहिला पत्ता १७८६ सदाशिव पेठ असा झाला. सायकलींचा गजबजाट असलेल ते पुणे शहर मला एकदम भावल.कॉलेज ला जायला सायकल मिळाली होती. सगळ शहर सायकलच्या आवाक्यात होत. आप्तेष्ट पण खूप . त्यांचा भावनिक आधार इथलं एकेपण जाणवू देत नव्हत. कॉलेज मध्ये बहुतेक विद्यार्थी  प्राध्यापक  हे सदाशिव-नारायण व सदाशिव पेठेत राहणारे होते. प्राचार्य जरा पलीकडे म्हणजे मोडेल कॉलोनी मध्ये राहत. पण काही जण जरा लांबून म्हणजे सोमवार पेठ, भवानी पेठ इथून येत. एक कृष्णकुमार अगरवाल -पुढे त्याने आडनाव गोयल लावले तो खडकी हून येत असे. पण असे अपवादात्मकच . कॉलेज बरोबर विद्यार्थी परिषद...

झुक झुक झुक अगीनगाडी

लहानपणापासूनच आगगाडीतून प्रवासाचे मला अप्रूप होतेच. तसे ते सर्वांनाच असते. माझ्या कळत्या वयात आम्ही विरार ला राहत होतो आणि तिथून अनेक वेळा मुंबईला लोकलने प्रवास होत असे. शिवाय घराच्या मागच्या अंगणात उभे राहिले की दूरवर रेल्वे रुळांवरून गाड्या जाताना दिसत . त्यात जोरात जाणाऱ्या म्हणजे फ्लायिंग राणी ही मुंबई ते सुरत जायची. तर पिवळे डबे असलेली डिलक्स गाडी दिल्लीला जात असे. अर्थात हे ऐकीव ज्ञान होते. लोकल व्यतिरिक्त मोठ्या म्हणजे इंजिन असलेल्या गाडीत पुण्याला जाताना बसायला मिळायचे. त्यात मोठा प्रवास व घाटातील बोगदे यांचे खूप आकर्षण असायचे. असे असताना वडिलांची बदली नागपूर येथे झाली . तेव्हा खूप वेळ गाडीत बसायला मिळणार याचा आनंद होता पण रात्री गाडीत झोपायचे कसे हा पण प्रश्न होता. पण पहिला ओव्हर नाईट रेल्वे प्रवास तेव्हा झाला. पुढे तिथून मग हैदराबाद, पुणे असे प्रवास होत राहिले आणि एका अर्थाने रेल्वे प्रवासाला आम्ही निर्ढावलो. रेल्वे बद्दल काही गोष्टी सहज समजत गेल्या. अमळनेर येथे शाळेत जायला रेल्वे रुळांवरून शॉर्ट कट होता. सुमारे १किमी अंतर चालताना दोन रुळांमधील सांधे कसे असतात, ते बदलताना ...

लडिवाळ बट

परवा मेहदी हसन साहेबांची एक गजल ऐकली  काही केल्या ती मनातून जात नव्हती.. गजल अशी होती - जन उस जुल्फ की बात चली ढलते ढलते रात ढली उन आन्खोने रुठके भी अपने उपर बात ना ली शाम्मओका अंजान ना पूछ परवानोंके  वो साथ जाले अबके भी वो दूर रहे  अबके भी बरसात चली  या गजल मधली उस जुल्फ मला लडिवाळ बट दिसू लागली. मग ती अशी साकारली. जेव्हा त्या लडिवाळ बटेची गोष्ट निघाली तेव्हा ती ढळता ढळता रात्र सरली  त्या डोळ्यांनी रुसून पण  न रुसल्याचा भाव दिला ज्योतीचा तो वेडेपणा पण फिदा झालेल्या पतंगा सोबत जळत राहिली जरी ती आता दूर गेली  तरी इथे बरसत राहिली. हे अस शब्दाशी खेळण मनाला आनंद देवून जात.१९७-७६ चा काळ असेल , रोज काही लिहावं वाटायचं आणि मी लिहायचो. पण तेव्हा ते कविता स्वरुपात असायचं. त्याची काही झलक आणि पूर्व स्मृतींना त्या निमित्ताने उजाळा द्यायचा प्रयत्न. एका गावाबाहेरच्या डोहाकाठ्च्या संध्याकाळी स्वत:चा श्वासोश्वास सुद्धा स्पष्ट ऐकू येण्या इतपत शांततेत डोहाच्या पाण्यात दगड टाकल्यानंतर निर्माण होणर्या वर्तुळांच्या अंतापर्यंत डोळे लावून ...

भेटीलागी जीवा

तशी कुणाशी भेट होणे ही आनंदाची गोष्ट असते. प्रियजनांच्या भेटीची आपल्याला आस लागते तर नको असलेल्या व्यक्तींशी भेट होऊ नये अशी आपण इच्छा करतो. अर्थात ते तसे होतेच असे नाही. तशाही सगळ्या गोष्टी आपणाला हव्या तशा घडतातच असे नाही. पण काही भेटा आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवल्या जातात. त्यातून काही मान्यवरांच्या भेटी झाल्या तर आपण त्याला भेटीचा योग्य म्हणतो. सुदैवाने बऱ्याच मान्यवरांना भेटायचा योग मला आला. काही संस्मरणीय ठरल्या तर काही खास अशा नव्हत्या. कलासागर दिवाळी अंकाच्या निमित्ताने पु ल देशपांडे, गोविंद तळवलकर, माधव गडकरी, एस के कुलकर्णी, श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर,दि बा मोकाशी,वीणा देव , दिलीप पुरुषोत्तम चित्रे,वि स वाळिंबे, शांता शेळके, बाळासाहेब मंगेशकर अशा मान्यवरांना भेटून त्यांच्याशी बोलायचा योग आला.तर किर्लोस्कर मासिकाचे काम असताना मुलाखत घेण्याच्या निमित्ताने पं.जसराज यांच्या भेटीचा योग आला. पूर्वी कधीतरी आसपास मोठे कलाकार असत पण त्याच्याशी जाऊन बोलण्याचे धाडस होत नसे. कॉलेज मध्ये साहित्य चर्चा मंडळाचा सचिव झल्यावर आनंद यादव, विद्याधर पुंडलिक, शंकर पाटील अशा लेखकांना ...

भीमसेनजींचा राग तोडी

आज सकाळी बस मध्ये बसलो आणि फोनवर संगीत सुरु केलं तो साक्षात पंडित भीमसेन जोशी यांच्या एका मैफलीतील तोडी रागाचे आलाप सुरु झाले. आणि मग सभोवतालचं सगळं विश्व त्या तोडीच्या स्वरांनी भरून गेलं. आलापातून हळू हळू तोडी रंगात चालला होता. बस आपल्या मार्गावरून पळत होती. पण हे सगळं विसरून मन मात्र गेलं होतं सवाई गंधर्व समारोहाच्या सांगता सोहळयात. तीन रात्री रसिकांना स्वरांच्या वर्षावात चिंब भिजवून झाल्यावर रविवार सकाळ उजेडात असतांना पंडितजी मंचावर येत असत. सगळं वातावरण भरून गेलेलं असताना तंबोरे गुंजन करू लागत आणि त्यात अलगद पंडितजींचा षड्ज संपूर्ण मांडवभर पसरत असे. त्या मांडवाचे रूपांतर अक्षरश: स्वर दरबारात होतं असे आणि त्या दरबारात पंडितजी एखाद्या सम्राटासारखे भासत. सर्व इंद्रियांनी साठवून ठेवावा असा तो सोहळा. तोडी, गुजरी तोडी, आसावरी , रामकली, गुणकली असे सकाळचे कितीतरी राग पंडितजींकडून ऐकले आहेत पण तोडी म्हणजे विलक्षण . विलंबित चीज नयनोवाली ते अशा काही नजाकतीने पेश करत की श्रोते आणि पंडितजी यांच्यात अद्वैत निर्माण होतं असे. आज तोडी ऐकताना हीच अनुभूती येत होती. जणू पंडितजी त्या समारोहात आपल...

..........मग लिहायला सुरुवात होते

..........मग लिहायला सुरुवात होते  शहरात   राहणार्यांना   नेहेमीच   आपल्या   गावाबद्दल   एक   आस्था ,  ओढ   असते .  वडिलांच्या   सरकारी   नोकरीनिमित्ताने   अनेक   ठिकाणी   वास्तव्य   झाल्याने   आत   कुठेतरी   मूळ   गावाबद्दल   विशेष   भावना मनात   असावी .  कारण   माझा   ना   तिथला   जन्म  ,  बालपण   वा   शिक्षण   झालेले .  पण   बरीच   गवे   शहरे   पाहून   फिरून   झाल्यानंतर   आपलं   गाव   हे   वेगळंच   आहे   याची   कुठेतरी   नोंद   मनात   होत   होती . गावी   घर   असल्याने   जाणे   होत   असे .  पण   एक   जाणीव   अशी   होती   की   गावी   जाणं   हे   कष्टप्रद   होतं .  लहान   पणी   प्रवास   कसा   होईल   वगैरे   गोष्ट...