Posts

Showing posts from April, 2020

एका कादंबरीची डायरी

Image
परवा एक प्रकाशक भेटला. बोलता बोलता म्हणाला तुम्ही एक झकास कादंबरी लिहा . आपण कमीतकमी ५ तरी आवृत्त्या काढूच. जबरदस्त मार्केटिंग करू. त्यावर पिक्चर काढू , डेली सोप साठी पण प्रयत्न करू. आपल्या दोघांची जिंदगी बनून गेली पाहिजे. ही चर्चा फक्त चहावर झाल्याने मी ती उडवून लावली नाही. पण हवेत पण नाही उडायला लागलो. एका आठवड्याने पुन्हा त्याचा फोन आला मग मात्र मी गंभीर पणे विचार करायला लागलो. तशा माझ्या दोन कादंबर्या प्रकाशित झालेल्या असल्याने थोडा आत्मविश्वास होताच. एखादा कथेचा प्लॉट निश्चित करायचा आणि लिहायला सुरुवात करायची. पुढे आपोआप कादंबरीचा प्रवास सुरु होतो. पण चार पाच दिवस उलटले तरी कथानकाचा प्लॉट तयार होत नव्हता. कारण कथानक असे पाहिजे की ज्याला रिपीट वाचक मिळाला पाहिजे. त्यात एखादा चित्रपट तयार होईल असे नाट्य हवे. शिवाय अनेक रोचक प्रसंगांची मालिका हवी जेणेकरून त्यावर मालिका करणे सोपे जाईल. आणि तसे कथानक काही सुचत नव्हते. शिवाय त्यावर बराच विचार करता येईल इतका वेळ पण नव्हता . जास्तीत जास्त दिवसाकाठी एखादा तास काढता येणार होता. मग त्यावर एक तोडगा काढला. दिवसाकाठी जेवढा विचार होई...

रुटीन गाण्याचे आणि खाण्याचे

Image
सकाळी उठल्यापासून आपण काही ना काही खात वा पित असतो. त्याचे तसे एक रुटीन असते. म्हणजे ते कधीतरी बदलते किंवा आपण ते मोडतो. तो एक जीवनाचा भाग आहे. त्याला जर आपण एक संगीताच्या किंवा गाण्याच्या रुटीन ची जोड दिली तर आपले आयुष्य जरा वेगळे म्हणजे खास होवून जाईल . सुरुवात सकाळच्या चहापासून करूया. सकाळचा पहिला चहा म्हणजे तो कसा हवा तर एकदम फक्कड. ज्याने दिवसाची सुरुवात कशी होणार ते ठरते. हा चहा म्हणजे मला सकाळी आकाशवाणी वर सुरुवातीला बिस्मिल्ला खान यांच्या शहनाई वर जितका पवित्र ललत वाटतो तसा व्हायला पाहिजे. या नंतर सकाळचा नाश्ता. यात उपमा, पोहे, इडली, ब्रेड बटर , उकडलेली अंडी असे पदार्थ येतात. ते आसावरी, भैरव, बिभास, भटियार, तोडी ,बैरागी यांच्या वाटेने जायला हवा. म्हणजे समाधान तर व्हायला हवे पण थोडी अपूर्णतेची हुरहूर पण हवी. दुपारचे जेवण मग ते काही पण असो ते अगदी शुद्ध सारंग किंवा मधमाद सारंग या सारखे. शांत, तृप्तीचा हुंकार देणारे , पोटाबरोबर मन पण शांत करणारे. यानंतर दुपारचा चहा किंवा कॉफी हे कधी एकटे  येत नाहीत. सोबत मिश्र रागासारखी त्या सोबत बिस्कीटे, टोस्ट पण येतात. बिस्कीट अ...

पिउनी चंद्रतुषार

Image
चंद्राची शीतलता ,प्रणयी जीवांची ओढ,चांदण्यांच्या निरभ्र आकाशामुळे निर्माण होणारे सुखद वातावरण या सर्वांचा स्पर्श चंद्रकंस च्या सुरांना आहे. मालकंसच्या तुलनेत चंद्रकंस खेळकर वाटतो. या रागाची निर्मिती अपघाताने झाली असे सांगतात. एकग बी.आर.देवधर हे हार्मोनियम वर मालकंस वाजवत बसले होते. आणि चुकून त्य्नाचा हात कोमल निषादा ऐवजी शुद्ध निषादाच्या पट्टीवर पडला. काही तरी छान वाजतंय असं वाटलं म्हणून ते पुन्हा पुन्हा मालकंस मध्ये शुद्ध निषाद वाजवून बघत होते. आणि चंद्रकंस राग जन्माला आला. याला मालकंस अंगाचा चंद्रकंस म्हणून ओळखले जाते. एका शुद्ध निशादामुळे आणि रिषभ या स्पर्श स्वरामुळे या रागाचा वेगळा माहोल बनतो. देवधर यांचे शिष्य पंडित कुमार गंधर्व गुरुंची “येरी पिया बिन मोहे चैन नाही आये” ही झपतालातील बंदिश गाताना लयीच्या बोल अलापातून चंद्रकंस चा व्रात्यपणा ,खेळकरपणा व अल्लडपणा दाखवून मैफलीत रसरसलेपण आणत.  एकेकाळी सोलो ताब्लावादानासाठी लेहरा हा चंद्रकंस मधलाच हवा असा बहुतेक दंडक असायचा. चंद्रकंस म्हटले की मित्र दिवाकर बुरसे याच्या कवितेची आठवण येते. आज चंद्रकंस ची आठवण आली आणि ...

साहेब-असे आणि तसेही

Image
साहेब या शब्दातच एक दरारा व रुबाब असतो आणि अगदी लहानपणापासून हे पाहत आलो आहे. माझे वडील हे सरकारी नोकरीत होते व त्यांचा मुद्दा होता डेप्युटी सुपरिंटेंडंट त्या मुळे प्रत्येक ठिकाणी एक सुपरिंटेंडंट म्हणजे साहेब असायचे. त्याना सगळे वचकून असायचे, शिपाई सॅल्यूट करायचे.त्याना रहायला मोठा बंगला असायचा. पण एक साहेब असे आले की त्यांना चार मुले होती. मोठा मुलगा मोठा होता पण दोन नंबरचा मुलगा माझ्या बरोबरचा होता. आणखी एक लहान बहीण व भाऊ.त्या मुळे तेथील अन्य मुले मिळून छान ग्रुप जमला. आमची शाळा एक मैल लांब होती पण साहेबांच्या मुळे सर्व मुलांना शाळेत जायला व यायला सरकारी बैलगाडीची सोय झाली. त्यांचा रुबाब व दरारा कायम ठेवून पण घरात मुक्त प्रवेश मिळाला. त्यांच्याबरोबर वडिलांचे छान सूर जुळले होते. पण सरकारी नोकरीत एक बदली सगळे बदलून टाकते. वडिलांच्या पुढच्या नोकरीत पण नंतर अनेक साहेब भेटले पण माझे वय वाढत गेले आणि मग साहेबांशी जरा जवळीक वाढू लागली. अनेक वेळा त्यांचे मार्गदर्शन मिळे. वेगवेगळी व्यक्तिमत्वे व त्यांच्या आठवणी मनात साठत होत्या आणि आता प्रत्यक्ष स्वत:चे साहेब आयुष्यात आले. बव्हंशी सर्व स...

मन आनंद आनंद डोले-मुक्त चिंतन

Image
मन असल्यामुळेच माणसाला मनुष्य, मानव असे म्हटले जात असावे कारण यात म आणि न ही दोन्ही अक्षरे येतात. संस्कृतोत्भव सर्व भाषांमध्ये माणसाला मानव हे संबोधन प्राप्त आहे. पूर्वी मनुनावाचे एक हृषी होवून गेले व त्यांनी मानवाच्या आचार विचारावर बंधने घालणारा जो ग्रंथ लिहिला तो मनुस्मृती म्हणून ओळखला जातो व आता तो बराचसा कालबाह्य झाला आहे. पण हा जो मानवी समुदाय आहे त्याच्या आचार विचारावर काही निर्बंध, कायदे, हे समाज व्यवहार सुरळीत राहण्यासाठी आवश्यक आहेत त्यामुळे मनुस्मृतीची जागा पिनल कोड ने घेतली . हा आजचा विषय नाही पण मनु ऋषींचे नाव हे पण मन या अक्षरानीच बनले आहे. त्यामुळे मन आणि मनुष्य यांचे एक अतूट नाटे आहे अशा निष्कर्षाप्रत आपण येतो. मानवी शरीर हे माणसाचे दृश्य स्वरूप. हे कुणालाही दिसते. तसेच ते एकाला दिसते तसेच दुसर्यालाही तसेच दिसते . मानवाचे निर्गुण निराकार रूप म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व. हे दैसात नाही पण अनुभवता येते आणि हा अनुभव हा व्यक्तीसापेक्ष असतो. शरीर शास्त्राचा अभ्यास केला तर त्यात कुठे ही मन आढळत नाही. पण मानवाच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर यात मनाचा थोडा ठाव लागू शकतो. हे...

यमन - ये मन है

Image
यमन रागाला रागांचा राजा म्हटले जाते . बरेच गुरुजन आपल्या शिष्यांकडून यमन घोटून घेतात. कारण त्यांचा असा विश्वास असतो की एकदा गळ्यावर यमन चढला की मग कोणताही राग त्या गळ्यातून गायला जावू शकतो. बाकी यमन बाबत काही लिहिण्यापूर्वी यमन बाबत एक गोष्ट द्यायचा मोह होतो आहे. एकदा एक गुरुजी रागाचे सूर आळवत बसले होते . तेव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की ये कौनसा राग है? यावर गुरुजी उत्तरले - " बेटा , ये मन है " यमन रागाविषयी एवढ यथार्थ वर्णन अजून तरी कुठे सापडले नाही. यमन म्हणजे मनच. मनात भाव भावनांचे कल्लोळ उठतात. मनाचा ठाव कुणास लागलाय? मन मनास उमगत नाही हेच खर. यमन हा कल्याण थाटातून थेट येणारा राग आहे. यमन हा कल्याण म्हणून पुरातन काळापासून अस्तित्वात आहे.यमन च्या व्युत्पात्तीबाबत बरेच वाद व मत-मतांतरे आहेत. पण यमनचे स्वर आणि वादी संवादी स्वर याबाबत फारसे वाद नाहीत. यमन हा संपूर्ण राग आहे .गांधार - निषाद हे याचे वाडी संवादी स्वर असले तरी तसे सर्वच सूर महत्वाचे आहेत. त्यामुळे कलाकाराला सर्वच सुरांना गोंजारावे लागते. एका ठिकाणी याचे फार छान वर्णन सापडले. त्रिपुरी पौर्णिमेच्...